शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 8:06 PM

सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली.

हरियाणातील कर्नाल येथील गुरुद्वारामध्ये आयोजित शीख संमेलनात माजी उपराज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते जगदीश सिंह झिंडा यांनीही भाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, "कंगना राणौत राजकारणात अल्पवयीन आणि अपरिपक्व आहे. ती विनाकारण वाद निर्माण करते. भारतीय जनता पक्षाने तिची पक्षातून हकालपट्टी करावी."

कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "सरकारने शीख समाजाच्या कामात हस्तक्षेप करू नये. सरकार आपल्या कामात यशस्वी होत नाही, मग ते रस्ते दुरुस्ती असो, कालव्यांची देखभाल असो किंवा शेतीशी संबंधित समस्या असो. शीख समाज आपलं काम उत्कृष्टपणे करत आहे."

मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. "जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. माझ्या कार्यकाळात कोणीही श्रीनगरच्या जवळही जात नसे. आता परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे." शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मलिक म्हणाले, "शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत" असं म्हटलं आहे. 

मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही कौतुक केलं. राहुल गांधी अतिशय शांत आणि विनम्र आहेत असं म्हटलं. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आहे, पण ज्या भागात शेतकरी आंदोलन झाले, तेथे त्यांचा पराभव झाला. मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा एकमेव अजेंडा भ्रष्टाचार करणं, पैसा कमवणं आणि सत्तेत राहणं आहे." 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी