शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी मंत्री गायत्री प्रजापती अखेर अटक

By admin | Published: March 15, 2017 9:04 AM

सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 15 - उत्तरप्रदेशच्या माजी अखिलेश सरकारमधील मंत्री आणि सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. पण 27 फेब्रुवारीपासून गायत्री प्रजापती फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होती, मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. मंगळवारीच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी 24 तासात त्यांना अटक करु असं आश्वासन दिलं होतं. गायत्री प्रजापतींचा अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली सहा पथकं कामाला लावली होती.
 
 
उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानात अमेठी येथे मतदान केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेले गायत्री प्रजापती हे गायब झाले, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.  गायत्री प्रजापती परदेशात पळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. या वृत्तानंतर देशभरातील विमानतळांवर आणि एक्झिट पॉइंटवर अलर्ट जाहीर करण्यात आला होता. 
 
अटक टाळत असलेले उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नव्हता. प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होते. अटक टाळण्यासाठीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेच प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर प्रजापतींनी हा राजकीय कट असल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती; मात्र न्यायालयाने ती अमान्य केली होती.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गायत्री प्रजापती यांच्यासह सहा जणांविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या चौकशीचा पाठपुरावा केला जात नसल्याचे आढळून आले आहे, असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला राजकीय रंग देण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 
 
समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून याबाबतचा कृती अहवाल बंद पाकिटात आठ आठवड्यांत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांना दिले होते.
आपल्याविरुद्धचे आरोप खोटे असून, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य बाजू मांडली नसल्याचा दावा प्रजापती यांनी केला होता. प्रजापती यांच्याविरुद्धची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. 
 
अखिलेश यादव यांनी या प्रकरणी मौन सोडताना सांगितले होते की, 'या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, उत्तर प्रदेश सरकार राज्य पोलिसांना त्यासाठी योग्य सहकार्य करत आहे'. मात्र अखिलेश यांनी गायत्री प्रजापती यांचा बचावही केला होता. बदायूँसारख्या प्रकरणात आरोपांपेक्षा सत्य वेगळेच असल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले. तर प्रजापती यांना अखिलेश यांच्या घरात लपवून ठेवल्याचा आरोप भाजपाने केला होता.