शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Coronavirus : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी, स्पष्ट धोरण नाही; कपिल सिब्बल यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:00 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या. कोरोनाविषयक लढ्यात केंद्राकडे स्पष्ट धोरण नाही, सिब्बल यांची टीका

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या.कोरोनाविषयक लढ्यात केंद्राकडे स्पष्ट धोरण नाही, सिब्बल यांची टीका

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येताना दिसतोय. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून केंद्रावकर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्रावर निशाणा साधला आहे. बुधवारी नैनिताल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.हेही वाचा - देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा

"कोरोनाचं नियंत्रण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. मोदी सरकारकडे कोरोना विरोधात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट धोरण नाही. यामुळेच आज देशातील परिस्थितीत बिकट होत चालली आहे. पूर्ण बहुमत असूनदेखील आज देशाच्या समोर नेतृत्वाचं संकट उभं राहिलं आहे," असं सिब्बल म्हणाले. 

स्पष्ट धोरण आखण्यास सरकार अयशस्वी"देशातील कोरोनाची संसर्गाची परिस्थितीत हाताबाहेर देी आहे. सध्या दर आठवड्याला २० हडार लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत सरकार कोरोनाविषयक स्पष्ट धोरण आखण्यास अयशस्वी ठरलं आहे. देशात आरोग्य सेवांच्या अभावामुळे अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. सरकार लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेडदेखील उपलब्ध करून देऊ शकत नाहीये," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.लढाई एकत्र लढायची आहेनुकत्या निकाल लागलेल्या पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेच्या स्थितीवर उत्तर देताना सिब्बल यांनी या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगितलं. तसंच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा या विषयावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. कोरोना विरोधातील लढाई आपल्याला एकत्र लढायची आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदी