शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:35 IST

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे.

इंदोर: माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. इंदोरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सलमान खुर्शीद यांनी यावरून उघडपणे भाष्य केले. देशातील वातावरण बिघडत चालले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे. भारतातील नागरिक सुखी असल्याचे पाहायला मिळत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोभ तसेच दुसरे म्हणजे बदल घडवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.  

देशातील वाढत्या जातीय तणावावरही त्यांनी आपले मत मांडले. सलमान खुर्शीद म्हणाले की, आजच्या घडीला देशात जातीय बाबींना जाणीवपूर्वक महत्त्व दिले जात आहे. विविध वर्गांमध्ये तेढ वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक एकमेकांवर घृणास्पद आरोप करत आहेत. यामागे राजकीय कारणे आहेत. देशवासीयांची विचारसरणी अशी नाही. याला कोणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सयंम बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे

नुपूर शर्माप्रकरणी बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणतीच उच्च संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाला आदरपूर्वक सांगू शकतो की, यावर पुनर्विचार करावा. परंतु, सर्वोच्च न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. 

लोभामुळे हे सगळे घडतेय

देशात उद्भवलेल्या सद्य स्थितीमागील कारण लालसा, लोभ असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. आता पैसा चालत नाही, मग लोक धर्माचा आसरा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला आता अशा नेतृत्वाची गरज आहे, जे या विचारसरणीत बदल घडवून आणेल, जसा बदल राष्ट्रपिता महात्मा गांधीनी घडवून आणला होता, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसने आपल्या सद्यस्थितीबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशात नेमके असे काय बदल झाले आहेत, ज्यामुळे आपण देशातील राजकारणात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले आहोत, असे नमूद करत, देशातील वातावरण चांगले नसून, देशवासी सुखाने नांदताना दिसत नाहीत, असा दावा खुर्शीद यांनी केला.  

टॅग्स :Politicsराजकारणsalman khurshidसलमान खुर्शिदCentral Governmentकेंद्र सरकार