शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

भाजपच्या राजवटीत स्वातंत्र्य, राज्यघटनेला गंभीर धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:51 IST

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल : विद्वेषाचे राजकारण सुरू

दार्जिलिंग : भाजपच्या राजवटीत देशाचे स्वातंत्र्य व राज्यघटना यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.

येथील प्रचारसभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दार्जिलिंगमध्ये काही प्रश्नांवरून असंतोष निर्माण झाला आहे. भाजप त्याचा राजकीय फायदा घेऊ पाहात आहे. त्या प्रश्नांचे भांडवल करून निवडणुकांमध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रकार भाजपने केला आहे. जेवढी या प्रश्नांची धग वाढेल तितका त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल असा या पक्षाचा विचार आहे. दार्जिलिंग, कालिमपाँग, मिरिक आदी विभागांचा उत्तम विकास व्हावा असे भाजपला वाटत नाही. दार्जिलिंगमधील भाजपचे विद्यमान खासदार एस. एस. अहलुवालिया यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर या भागाला कधीही भेट दिली नाही. त्यांनी विकासाची कामे केली नाहीत.

भाजपच्या राजवटीत गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लोकांना विसर पडला आहे. देशामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. विद्वेषाचे राजकारण सुरू आहे. यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका निर्माण झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)मोदी स्वप्रसिद्धीत मग्नमोदी यांची खिल्ली उडविताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची प्रसिद्धी करण्यातच मग्न आहेत.मोदी हे इतके महान नेता बनलेत की त्यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनू लागले आहेत. त्यांच्या नावे नमो दुकाने उघडली असून त्यात नमो सुट विकत मिळतात. या दुकानांमध्ये नमो स्लीपरही विकत मिळतील.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019