शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यकच; पोलीस व्यवस्थाही उत्तम असली पाहिजे : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 22:31 IST

संसद, राज्यांच्या विधानसभा, न्यायव्यवस्था, सीएजी, निवडणूक आयोग अशा अनेक संस्थांना लोकशाहीनं यशस्वी केलं असल्याचं गृहमंत्र्यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देसंसद, राज्यांच्या विधानसभा, न्यायव्यवस्था, सीएजी, निवडणूक आयोग अशा अनेक संस्थांना लोकशाहीनं यशस्वी केलं असल्याचं गृहमंत्र्यांचं वक्तव्य.

"लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे थेट उत्तम पोलीस व्यवस्थेशी जोडलेलं आहे. यामध्ये सातत्यानं सुधारणा करण्याची हरज आहे. पोलीस व्यवस्थेच्या पाया म्हणजे बीट कॉन्स्टेबल, सामान्य व्यक्तीचं संरक्षण करून लोकशाही यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे," असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या ५१ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. जर कायदा आणि व्यवस्था चांगली नसली तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नसल्याचंही ते म्हणाले. 

"लोकशाही हा आमचा स्वभाव आहे. स्वातंत्र्यापूर्वीही हे आमचं चरित्र होते आणि स्वातंत्र्यानंतर आम्ही ते स्वीकारलं. हा आपल्या लोकांचा स्वभाव आहे. लोकशाहीत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य," असं शाह म्हणाले. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा थेट संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

लोकशाही केवळ पक्षांना मत देणं आणि सरकार तयार करण्याबाबत नाही. ते केवळ एका व्यवस्थेचा भाग आहे. लोकशाही यशस्वी करण्याचं फलित काय? याचा परिणाम असा झाला की देशातील १३० कोटी लोक स्वतः त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेनुसार स्वत:ला विकसित करण्यासाठी काम करत आहोत, ज्यामुळे देशाला फायदा होता," असंही ते म्हणाले.

"कायदा, सुव्यवस्था चांगली नसेल तर लोकशाही समृद्ध होऊ शकत नाही"देशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसेल तर लोकशाही समृद्ध होऊ शकत नाही यावरही त्यांनी भर दिला. "हे काम पोलीस आणि सुरक्षा दलांकडून करण्यात येतं. एक यशस्वी लोकशाहीसाठी कोणत्याही व्यक्तीची सुरक्षा निश्चित व्हावी हे महत्त्वाचं आहे. नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार अखंडपणे मिळत राहिले पाहिजेत. तसंच संविधानानुसार नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असावं," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहPoliceपोलिसdemocracyलोकशाहीIndiaभारत