शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केली होती मात
2
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
3
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
4
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
5
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
6
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
7
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
8
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
9
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
10
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
11
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
12
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
13
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
14
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
15
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
16
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
17
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
18
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
19
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
20
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     

कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 8:36 AM

Chawal Wale Baba: सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात.

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात. ते रनपेटा गावामध्ये भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत. भागवत कथेबरोबरच ते लोकांचे भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगतात. त्यांच्या दरबारात लोक मुठभर तांदूळ घेऊन येतात. त्याच तांदळापासून भागवताचार्य शास्त्री लोकांची कुंडली तयार करतात. ते माता भगवती आणि ठाकूरजी यांना आराध्य मानतात. जेव्हा भविष्य सांगायचं असेल तेव्हा ते त्यांच्या मनातून त्यांच्या आराध्यांचं स्मरण करतात. मग चमत्कार घडतो, असे शास्त्री सांगतात.

कुंडली तयार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख किंवा नाव जाणून घेण्याची गरज नाही. एक मुठभर तांदूळ वापरून पूर्ण कुंडली तयार होते. त्यांचं नाव काय आहे. कुठे जन्म झाला.  कुठल्या तारखेला जन्म झाला. त्याला काय त्रास आहेत. सर्व काही समोर येते. त्याच आधारावर त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं.

बाबांच्या दरबारातून भुतकाळ आणि भविष्यकाळाबाबत जाणून घेतल्यावर बाहेर आलेल्या लोकांना आत बसलेल्या बाबांनी मुठभर तांदूळ पाहून भविष्य सांगितलं का, त्यात किती सत्यता आहे, तुम्ही त्यावर किती समाधानी आहात? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता लोकांनी बाबांना आधीपासूनच सारं काही माहिती असतं. त्यांच्या आशीर्वादाने समस्यांचं निराकरण होतं, असं सांगितलं.

आचार्य शास्त्री हे त्यांच्या चमत्कार आणि सिद्धीसाठी ओळखले जातात. सोबतच कुठेही पूजा भागवत कथा यातून जी काही दक्षिणा, वस्तू मिळतात, त्या ते गावातील गरीब मुलींना दान करतात. तिथून ते आपल्यासोबत काही आणत नाहीत. आतापर्यंत त्यांनी २८६ गरीब मुलींच्या विवाहासाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम कन्यादान म्हणून खर्च केली आहे. तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कन्यादान करत राहीन, असं ते सांगतात.

दरम्यान, बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते आध्यात्म आणि सनातनसाठी जे काही करत आहेत, ते कौतुकास्पद असल्याचे  आचार्य शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आणि आमचा दरबार यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दरबारात भूत प्रेत आदि बाधांशिवाय काही दिसत नाही. तर आमच्या दरबारात कुठलाही तंत्र किंवा मंत्र केला जात नाही. जे काही होतं ते ठाकूरजींच्या कृपेने होतं.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndiaभारत