आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 06:06 AM2024-01-14T06:06:29+5:302024-01-14T06:08:04+5:30

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

From today, Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra', will travel through 15 states | आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

इंफाळ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी मणिपूरमधून सुरुवात होत आहे. ही यात्रा १५ राज्यांतील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास करणार आहे.

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील एका मैदानातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व पक्षाचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: From today, Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra', will travel through 15 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.