शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मणिपूरमध्ये भाजपची पहिल्या सरकारसाठी मोर्चेबांधणी

By admin | Published: March 13, 2017 12:59 AM

मणिपूरमध्ये प्रथमच मुसंडी मारत भाजपने सरकार स्थापण्यासाठी चाचपणी चालविली आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपने रालोआच्या तीन आमदारांचे समर्थन लाभल्याचा दावा केला आहे.

इम्फाळ : मणिपूरमध्ये प्रथमच मुसंडी मारत भाजपने सरकार स्थापण्यासाठी चाचपणी चालविली आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपने रालोआच्या तीन आमदारांचे समर्थन लाभल्याचा दावा केला आहे.

मणिपूरच्या ६० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना ३१ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्रिशंकू विधानसभेत सर्वाधिक २८ जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. २१ जागा पटकावणाऱ्या भाजपनंतर नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ईशान्य लोकशाही आघाडीने प्रत्येकी चार काबीज केल्या. रालोआचा घटक पक्ष असलेला एलजीपी, तृणमूल काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

एनपीपी-४, लोजपा-१ हे स्वतंत्ररीत्या लढले असले तरी रालोआत घटक पक्ष आहेत. आम्ही तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष आमदारासोबत चर्चा करू, असे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार भाजपचे नेते एन. बीरेन यांनी पत्रकारांना सांगितले. ईशान्येत भाजपला अभूतपूर्व यश आसाममध्ये भाजपने २०१६ मध्ये धक्कादायक विजय मिळविला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या ईशान्येत या पक्षाने आपले पाय भक्कमपणे रोवले असल्याचे मणिपूरच्या निकालाने स्पष्ट केले आहे. एनपीएफचे काँग्रेसेतर पक्षाला समर्थन...मणिपूरची काँग्रेसपासून मुक्तता करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आम्ही काँग्रेसेतर पक्षाला समर्थन देणार असल्याचे नागा पीपल्स फ्रंटने (एनपीएफ) रविवारी स्पष्ट केले. या पक्षाने चार जागा पटकावल्या आहेत. आम्ही रालोआचा भाग असून काँग्रेसेतर पक्षांच्या ईशान्य लोकशाही आघाडीला समर्थन देणार आहोत, असे एनपीएझचे प्रवक्ते ए. किकोन यांनी म्हटले.