शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हॉटेलमध्ये सेवाशुल्क पूर्णपणे ऐच्छिक

By admin | Published: January 03, 2017 5:16 AM

हॉटेल आणि उपाहारगृहांनी ग्राहकांना बिलामध्ये परस्पर ‘सर्व्हिस चार्ज’ लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अशा आस्थापनांनी ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे फलक दर्शनी भागात लावून कोणतीही

नवी दिल्ली : हॉटेल आणि उपाहारगृहांनी ग्राहकांना बिलामध्ये परस्पर ‘सर्व्हिस चार्ज’ लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अशा आस्थापनांनी ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे फलक दर्शनी भागात लावून कोणतीही सक्ती न करता ग्राहकाने समाधानकारक सेवेची बक्षिशी म्हणून बिलाखेरीज वर आणखी काही रक्कम दिली तर तेवढीच स्वीकारावी, असा आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने काढला आहे.अनेक हॉटेल आणि रेस्टॉरन्टमध्ये दिलेली सेवा कशीही असली तरी, ‘टिपे’ला पर्याय म्हणून बिलामध्येच ५ ते २० टक्के ‘सर्व्हिस चार्ज’ लावून तो देणे ग्राहकांसभाग पाडले जाते, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने ग्राहक संरक्षण कायद्याचा हवाला देऊन हा खुलासा केला आहे.मंत्रालय म्हणते की, अशा प्रकारे सक्तीने ‘सर्व्हिस चार्ज‘ची वसुली बेकायदा आणि अनुचित व्यापारप्रथा असल्याने ग्राहकाने स्वत:ला वाटले तरच बिलाखेरीज आणखी रक्कम स्वखुशीने द्यावी. हॉटेल किंवा बिलातच उपाहारगृह अशी रक्कम समाविष्ट करत असेल तर ग्राहक त्याविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकतात व त्यांनी ती जरूर मागावी.या तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने इंडिया हॉटेल्स असोसिएशनला पत्र लिहून यावर त्यांचे म्हणणे मागविले असता असोसिएशननेही ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याने ग्राहक मिळालेल्या सेवेने असमाधानी असेल तर, अशी रक्कम बिलात लावली असेल तरी, तो ती कमी करून घेऊ शकतो, असे कळविले.सर्व राज्य सरकारांनी वरीलप्रमाणे कायदेशीर तरतुदींची सर्व हॉटेल व उपाहारगृहांना जाणीव करून द्यावी आणि ‘सर्व्हिस चार्ज’ ऐच्छिक आहे व समाधानकारक सेवा मिळाली द्यावी. हॉटेल किंवा उपाहारगृह बिलातच अशी रक्कम समाविष्ट करत असेल तर ग्राहक त्याविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकतात व त्यांनी ती जरूर मागावी. या तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने इंडिय हॉटेल्स असोसिएशनला पत्र लिहून यावर त्यांचे म्हणणे मागविले असता असोसिएशननेही ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याने ग्राहक मिळालेल्या सेवेने असमाधानी असेल तर, अशी रक्कम बिलात लावली असेल तरी, तो ती कमी करून घेऊ शकतो, असे कळविले.सर्व राज्य सरकारांनी वरीलप्रमाणे कायदेशीर तरतुदींची सर्व हॉटेल व उपाहारगृहांना जाणीव करून द्यावी आणि ‘सर्व्हिस चार्ज’ ऐच्छिक आहे व समाधानकारक सेवा मिळाली नाही तर अशी रक्कम बिलात लावली असेल तरी ती कमी करून दिली जाईल, असे फलक त्यांना दर्शनी भागात लावण्यास सांगावे, असेही मंत्रालयाने कळविले आहे.--------केवळ बड्या रेस्टॉरन्टमध्येच सेवाशुल्क आकारले जाते. हे शुल्क याआधीही ऐच्छिकच होते. आम्ही मेन्यूच्या खाली तशी सूचनाही देतो. त्यामुळे ज्या ग्राहकाला हे शुल्क द्यायचे नसेल, तो निघून जाऊ शकतो. मात्र जेवण झाल्यानंतर समाधान झाले नाही, तर सेवाशुल्क न देण्याचे स्वतंत्र्य ग्राहकांना देण्याचा केंद्राचा मानस असेल, तर ते अत्यंत अव्यवहार्य आहे. त्यामुळे त्याला साहाजिक सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून विरोधच होईल.- आदर्श शेट्टी, अध्यक्ष, आहार मुंबई.