शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गुलाम नबींच्या समर्थनार्थ एकवटले 'गांधी-23', सिब्बलांचा काँग्रेसला सल्ला; जाणून घ्या, कोण-कोण काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 15:41 IST

जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. (Ghulam Nabi's Jammu kashmir rally)

ठळक मुद्देकाँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे आणि आपल्याला याला बळकट करण्याची आवश्यकता आहे - कपील सिब्बलरॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले.काँग्रेस आणि देशाला गुलान नबींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता

जम्मू - राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi) जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत जी-23 (G-23)  चेही अनेक नेते उपस्थित आहेत. जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. (G-23 leaders in Ghulam Nabi's Jammu kashmir rally Kapil Sibbal said party has weakened we must accept it)

यावेळी बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपील सिब्बल (Kapil Sibbal) म्हणाले, काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे आणि आपल्याला याला बळकट करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला हवी. यावेळी कपील सिब्बल यांनी विमानाचे उदाहरण दिले. जेव्हा आपण विमानाने जातो, तेव्हा पायलट सोबत एका इंजिनिअरचीही आवश्यकता असते. असा इंजिनिअर ज्याला या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती असेल. गुलाम नबी आझाद काँग्रेससाठी याच भूमिकेत आहेत. त्यांना देशातील सर्वच राज्यांमधील तळागाळातील परिस्थितीची जाण आहे.

गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; दिग्विजय सिंह म्हणाले, "आम्हाला..."

देश आणि काँग्रेसला गुलाम नबींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता -काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले, आझाद एक एकनिष्ठ काँग्रेस नेते आहेत. जे नेते काँग्रेसला चांगल्या पद्धतीने समजतात त्यांपैकी एक आझाद आहेत. काँग्रेस आणि देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यावेळी भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, एखाद्या राज्याला तोडून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले, असे यापूर्वी कधीही झाले नाही. जम्मू काश्मीरचे तुकडे केले आणि आपण यासाठी लढत राहिलो.

G-23 नव्हे, गांधी-23 - राज बब्बरकाँग्रेस नेते राजबब्बर म्हणाले, आपल्याला जी-23 म्हटले जाते. मात्र, आपण गांधी -23 आहोत. काँग्रेस बलशाली व्हावी, अशी गांधी-23ची इच्छा आहे. पक्षाच्या आदर्शांमुळेच गुलामनबी मोठे झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या निवृत्तीवर भावूक झाले होते. 

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, आणखीही काही नेत्यांची या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, मी त्यांना थांबवले. तसेच, लोक लगेचच उलट सुलट अंदाज बांधायला सुरुवात करतील, असे म्हणालो. मी त्यांना पुढच्या वेळी यायला सांगितले. यावेळी त्यांनी आनंद शर्मा आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे स्वागत केले. याच वेळी, येथे उपस्थित असलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी संसदेत जम्मू काश्मीरच्या लोकांचा आवाज उचलला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसRaj Babbarराज बब्बर