शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

जगाचे लक्ष आता भारताकडे; देशोदेशीचे प्रमुख नेते भारतात; सुरक्षेसाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 11:18 AM

दिल्ली पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दल तैनात केले आहे, सीमा भागात गस्त वाढवली आहे.

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेसाठी अवघा भारत सज्ज झाला असून, जगभरातील प्रमुख नेते भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे या परिषदेत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान,   परिषदेच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रीय राजधानीत, विशेषतः नवी दिल्ली जिल्ह्यात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिस, निमलष्करी दल आदींनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवत आहेत. 

दिल्ली पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दल तैनात केले आहे, सीमा भागात गस्त वाढवली आहे. ५०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी, के-९ श्वानपथक आणि अश्वारूढ पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि काही केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचीही मदत घेतली जात आहे.

आफ्रिकन संघाचे स्वागत करण्यासाठी युरोपियन संघ उत्सुक

जी-२० शिखर परिषदेत आफ्रिकी संघाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे युरोपीय संघाने शुक्रवारी सांगितले. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ही माहिती देत त्यांच्या समावेशाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये जी-२० नेत्यांना पत्र लिहून नवी दिल्ली येथे होणाऱ्या शिखर परिषदेत आफ्रिकी संघाला गटाचे पूर्ण सदस्यत्व देण्याचा आग्रह धरला होता.

तिबेटी युवक काँग्रेसची निदर्शने

तिबेटी युवक काँग्रेसने शुक्रवारी उत्तर दिल्लीतील ‘मजनू का टिला’ परिसरात चिनी प्रतिनिधींच्या शिखर परिषदेत सहभागाविरोधात निदर्शने केली. आंदोलकांनी हातात फलक घेऊन चीनविरोधी घोषणा दिल्या.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी