शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गंगा जगातील सर्वात प्रदूषित नदी; अहवालातून धक्कादायक वास्तव पुन्हा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 12:04 IST

डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालातून गंगेची दुर्दशा अधोरेखित

नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं देशवासीयांनी अनेक आश्वासनं दिली होती. यातील एक आश्वासन गंगा नदीच्या स्वच्छतेचं होतं. मात्र 2019 ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. वर्ल्ड वाईड फंडच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे. भारतातील बहुतांश नद्या ओला आणि सुका दुष्काळ अनुभवतात. गंगादेखील त्याला अपवाद नाही. देशात दोन हजार एकाहत्तर किलोमीटर वाहणारी गंगा नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या गंगा नदीमुळे 10 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील शेती फुलते. मात्र प्रदुषणामुळे गंगा नदीची अवस्था अतिशय वाईट आहे. गंगा नदी ऋषिकेशपासूनच प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. गंगा नदी ज्या भागातून वाहते, त्या भागातील बहुतांश ठिकाणी शौचालयांची स्थिती दयनीय आहे. अनेक ठिकाणी लोक उघड्यावर शौचास जातात. यामुळे नदी प्रदूषित होते. कानपूरपासून 400 किलोमीटर अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. ऋषिकेशपासून कोलकात्यापर्यंत गंगा नदीच्या किनाऱ्यांवर अनेक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधील रसायनयुक्त पाणी थेट गंगा नदीत सोडलं जातं. त्यामुळे प्रदुषणात आणखी भर पडते. याशिवाय अनेक कारखान्यांमधील प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नदीत सोडलं जातं. त्यामुळे जीवनवाहिनी समजली जाणारी गंगा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहते. या सर्वच राज्यांमध्ये नदीची स्थिती अतिशय वाईट आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदी