शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 9:19 AM

गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

ठळक मुद्देगुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे.गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

अहमदाबाद, दि. 29- गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. पक्षातील या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसने शुक्रवारी भाजपवर पैसा आणि सत्तेच्या बळावर काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सध्या पक्षात असलेल्या आमदारांनाही तंबी दिली. जर पक्ष सोडून गेलात तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशा शब्दात काँग्रेसने आमदारांना खडसावलं. शुक्रवारी बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. तर काँग्रेसचे आमदार राघव पटेल यांनी लवकरच इतर पाच आमदारांसह राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. प्रतिष्ठेचा मुद्दा8 ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक हा काँग्रेससमोरील सगळ्यात मोठ्या चिंतेचा विषय आहे. ८ ऑगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होते आहे. यामध्ये एक जागा काँग्रेसकडे आहे तर इतर दोन जागा भाजपकडे आहेत. भाजपकडून पैशांचा वापर करून तिसरी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. भाजपकडून त्या तिसऱ्या जागेसाठी बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील नव्या समीकरणानुसार अहमद पटेल यांची जागा फसेल अशी चिन्ह दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडे सध्या 57 आमदार आहेत. त्यापैकी 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आमदारांची संख्या आता 51 झाली आहे. काँग्रेसला राज्यसभेतील जागा जिंकण्यासाठी एकुण 47 आमदारांची गरज आहे. पण पक्षामध्ये सुरू झालेल्या आमदारांच्या गळतीमुळे काँग्रेसच्या पारड्यातील आमदारांची संख्या कमी होत असून जागा जिंकण कठीण होत असल्याचं बोललं जातं आहे. अहमद पटेल यांची जागा जिंकणं हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. काँग्रेस पक्षातील सगळे महत्त्वाचे निर्णय हे अहमद पटेल यांच्याच सल्ल्याने घेतले गेल्याचं बोललं जातं.त्यामुळे अहमद पटेल यांना राज्यसभेतील जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.  गळती थांबविण्याचा प्रयत्न गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.