शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो' यात्रेत गौरी लंकेश यांच्या मातोश्री आणि बहीणीचा सहभाग, राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 8:13 PM

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दोघांनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर यात्रेत काही अंतर चालल्या देखील. राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांची गळाभेट घेत यात्रेत स्वागत केलं. पदयात्रेदरम्यान राहुल गांधी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या मातोश्रींचा हात धरुन चालताना दिसले.

गौरी लंकेश यांचे कुटुंबीय 'भारत जोडो यात्रे'त सामील झाले तेव्हा राहुल गांधी भावूक झाले. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. 'गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली. गौरी हिंमत करून उभी राहिली. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी उभा आहे, जे भारताच्या खऱ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा हा त्यांचा आवाज आहे आणि तो कधीच शांत करता येणार नाही", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

घाबरणार नाही, झुकणार नाही आणि थांबणार नाहीकाँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. "दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंब भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत आले होते. गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रतिनिधींनी दाबला होता. देशात पसरलेल्या या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरु आहे. आता आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही", असं काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री राजराजेश्वरी नगर, बेंगळुरू येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

एका देशात दोन ''भारत'' मान्य नाहीउद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'दोन भारत' एका देशात मान्य नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं. 'काल मी एका महिलेला भेटलो, तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. एक भारत, भांडवलदार मित्रांना ६ टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी. दुसरा भारत, अन्नदात्यांचे २४ टक्के व्याजावर कर्ज आणि संकटांनी भरलेले जीवन", असं ट्विट राहुल यांनी केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस