शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

बिहारमध्ये घमासान... आता तेजस्वी यादवांनीही बाह्या सारल्या; थेट इशाराच दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 09:24 IST

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.

पाटणा - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक बातम्यांमध्ये असताना बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी घमासान सुरू आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपासोबत युतीची घोषणा करू शकतात. त्यामुळे, महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. अद्याप यासंदर्भात कुठलेही अधिकृत विधान बड्या नेत्याने केले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका विधानाने राजकीय सत्तांतराचं 'वॉर' सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने हा सामना अटीतटीचा असल्याचे दिसून येते. त्यातच, पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यातच, तेजस्वी यादव यांनीही अप्रत्यक्षपणे नितीशकुमारांना इशाराच दिला आहे. सहजरित्या सत्तांतर होऊ देणार नाही, व इतक्या सहजपणे पुन्हा एकदा सत्तेचा मुकूट परिधान करु देणार नाही, असे विधान तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यामुळे, बिहारच्या राजकीय भूकंपावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाला आहे. तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यावर मध्यरात्री १ वाजता आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले असण्याची शक्यता आहे. आरजेडीकडून दलित चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनाही नितीशकुमार यांनी भेट न दिल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

ममता बॅनर्जी यांनीही दिली प्रतिक्रिया

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा