शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 5, 2020 09:32 IST

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले.

ठळक मुद्देभाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. काँग्रेसने या महापालिकेच्या 150 जागांपैकी तब्बल 146 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.या निवडणुकीत भाजपने 149 उमेदवार रिंगणात उतरवले होते

हैदराबाद - बहुचर्चित ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेचे (GHMC) निवडणूक निकाल आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत 48 जागांवर विजय मिळवला आहे. येथे भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्ष चारीमुंड्या चित झाले. काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने या निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, केवळ दोनच उमेदवार निवडून आले. हे दोनही उमेदवार काँग्रेसचे आहेत.

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले. काँग्रेसने या महापालिकेच्या 150 जागांपैकी तब्बल 146 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र यांपैकी केवळ दोनच निवडून आले. काँग्रेसपेक्षाही तेलुगू देशम पक्षाची स्थिती वाईट राहीली. कारण त्यांनी तब्बल 106 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांचा एकही उमेदवार नवडणून येऊ शकला नाही. 

या निवडणुकीत भाजपने 149 उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि त्यासाठी पक्षाने केंद्रातील नेते येथे प्रचारासाठी पाठवले. याचा परिणामही या निवडणुकीत दिसून आला. यामुळे भाजपच्या खात्यात 48 जागा आल्या. तर या निवडणुकीत एआयएमआयएम तिसऱ्या स्थानी राहिला.

येथे 2016 च्या निवडणुकीत केवळ 3 जागा जिंकणाऱ्या भाजपने 12 पट अधिक चांगली कामगीरी करत 48 जागा जिंकल्या. 2016 च्या निवडमुकीत भाजपने टीडीपीसोबत युती केली होती. तर 2009 च्या निवडणुकीत भाजपला 6 जागांवर विजय मिळाला होता.

असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMने 51 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी त्यांचे 44 उमेदवार निवडून आले. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष असलेल्या टीआरएसला 56 जागांवर विजय मिळाला. केसीआर यांच्या पक्षाने सर्वच्या सर्व 150 जागांवर उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी, 2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएसने 150 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर AIMIMने 44 जागाच जिंकल्या होत्यात. काँग्रेसंला तेव्हाही दोनच जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी