शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा

By admin | Published: November 04, 2015 1:59 PM

ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणावरून सतत विरोध सहन करावा लागणारे ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ' भारतातील राजकीय पक्षांनी त्यांच्या फायद्यासाठी माझा वापर करून घेतल्याने मी दुखावलो आहे. मी भारतातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून यापुढे भारतात कधीच येणार नाही' असे त्यांनी म्हटले आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत गुलाम अली यांनी दिल्लीतील कार्यक्रम रद्द केला होता, मात्र शिवसेनेच्या विरोधामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. 
गेल्या महिन्यात मुंबई व पुणे येथे गुलाम अली खान यांचा कार्यक्रम होणार होता, मात्र शिवसेनेने त्यांच्य कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवत तो उधळवून लावण्याचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमासाठी संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अली खान यांना दिल्ली कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. गुलाम अली यांनी होकार देताच ८ नोव्हेंबर रोजी त्यांची मैफिल आयोजित करण्याचे निश्चित झाले आणि त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली होती. पण गुलाम अली खान यांनी प्रकृतीचे कारण देत कार्यक्रम करण्यास अचानक नकार दिल्याने हा कार्यक्रम बारगळला.
मात्र आता गुलाम अली यांनी भविष्यात भारतात कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेच्या सततच्या विरोधामुळे आणि देशातील गढूळ वातावरणामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.