शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

By देवेश फडके | Published: February 14, 2021 2:01 PM

अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअनुच्छेद ३७० भाजपशिवाय कोणीही रद्द करणार नाही याची माहिती होती - आझादजम्मू आणि काश्मीर केंद्र शासित होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते - आझादकाँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे होऊ शकत नाही - आझाद

नवी दिल्ली : हे सर्व आश्चर्यकारक आणि अचंबित करणारे आहे. अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली (ghulam nabi azad says i never expected from modi government to abrogate article 370)

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असलेल्या गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. यावेळी अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रु अनावर झाले होते. या सर्व प्रसंगानंतर गुलाम नबी आझाद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. 

"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला

अशी कल्पना आयुष्यात कधीच केली नव्हती

जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येईल, अशी कल्पना मी उभ्या आयुष्यात केली नव्हती. मोदी सरकारने विशेष राज्याला कमीपणा आणण्यासाठी असे केले असून, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत राजकीय स्थैर्य येणार नाही, असा दावा आझाद यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे नाही

सुमारे १८ वर्षे सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. गांधी कुटुंबाशिवाय अन्य कुणाला अध्यक्षपद दिले जाऊ शकत नाही का, या प्रश्नावर आझाद म्हणाले की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य कोणाला अध्यक्षपद दिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय यांना एकमेकांपासून वेगळे केलेच जाऊ शकत नाही. गांधी कुटुंबीयांचा त्याग मोठा आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. तुम्ही ते विसरू शकत नाही, असे नमूद करत प्रत्येक स्तरावर पक्षाला मजबूत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय काँग्रेसची स्थिती सुधारणार नाही, असे मत आझाद यांनी नोंदवले. 

ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

प्रतिमा मलीन होण्याची पर्वा नाही

राज्यसभेतील प्रसंगानंतर माझी प्रतिमा मलीन होईल का, याची मला अजिबात पर्वा नाही. इंदिरा गांधी यांची स्तुती करताना मी अटल बिहारी वाजपेयी यांना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती केली होती. अटलजींनी संजय गांधी यांचेही कौतुक केले होते. संजय गांधी यांनी अटलजींवर टीका केली, तरी अटलजींनी त्यांना पाठिंबा दिला होता. यांसारख्या अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. आताच्या घडीचे नेते त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

मोदी पक्के भाजपवाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला निमंत्रित केले का, या प्रश्नावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, मी पक्का काँग्रेसवाला आहे, हे मोदींना माहिती आहे आणि मोदी पक्के भाजपवाले आहेत, हेही मला माहिती आहे. काही झाले, तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, हे त्यांना माहिती आहे, असे आझाद यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी