शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

मोठ्या उद्योगासाठी गिरीराज सिंहांना साकडे सी.आर.पाटील समन्वय साधणार : उद्योजकांनी घेतली विमानतळावर भेट

By admin | Published: December 14, 2015 12:16 AM

जळगाव : औरंगाबादच्या तुलनेत जळगावात औद्योगिक विकास जास्त होता. मात्र दरम्यानच्या काळात एकही मोठा उद्योग जळगावात नसल्याने येथील औद्योगिक विकास खुंटला आहे. जळगाव शहरात आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती जिंदाच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांना घालण्यात आले.

जळगाव : औरंगाबादच्या तुलनेत जळगावात औद्योगिक विकास जास्त होता. मात्र दरम्यानच्या काळात एकही मोठा उद्योग जळगावात नसल्याने येथील औद्योगिक विकास खुंटला आहे. जळगाव शहरात आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती जिंदाच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांना घालण्यात आले.
रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास राज्यमंत्री गिरीराज सिंह यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, अंजनीप्रसाद मुंदडा, संजय तापडीया, रेमंडचे राहुल मिनारी, सुनील पाटील, दालमिल मालक मनोज नागला, दिनेश राठी, चटई उद्योजक किरण जोशी, अभिषेक सिंग, अरुण लाहोटी आदी उद्योजक उपस्थित होते.
अंजनीप्रसाद मुंदडा यांनी माहिती देतांना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जळगाव शहर हे औरंगाबाद पेक्षा समृद्ध होते. मात्र या ठिकाणी ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज आल्यामुळे त्यांच्याशी संबधित लघुउद्योगाचे जाळे निर्माण झाले. त्यामुळे काही वर्षात औरंगाबादचा विकास झाल्याचे त्यांनी गिरीराज सिंग यांना सांगितले.
जळगाव औद्योगिक वसाहतीत १२०० छोटे व मोठे उद्योग आहेत. त्यातील तब्बल ४० टक्के उद्योग हे बंदस्थितीत आहेत. आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग जळगावात आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी यावेळी गिरीराज सिंग यांना केली.
त्यावर सिंग यांनी जळगावातील औद्योगिक विकासासाठी खासदार सी.आर.पाटील हे समन्वयकांची भूमिका पार पाडतील असे आश्वासन दिले. तसेच जळगावात मोठा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, भाजपा अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, भास्कर बोरोले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोबत फोटो- ५९