शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

मला एक संधी द्या!

By admin | Published: August 28, 2016 5:20 AM

‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार

नवी दिल्ली : ‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करतील, अशी मला आशा आहे, पण काश्मीर प्रश्न केवळ चर्चेनेच सुटू शकतो, रस्त्यांवर आंदोलने आणि हिंसाचार करून सुटू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्व आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे,’ असे आवाहन जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.मेहबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत दोघांत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीनंतर त्या म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपाचे सरकार आल्यापासून हिंसाचार उफाळला, हे खरे नाही. काश्मिरात २00८ पासून अस्वस्थता आहे. पाकिस्तानातून दहशतवादी खोऱ्यात येऊन स्थिती आणखी बिघडवत आहेत. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने काश्मीरच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज स्थिती इतकी चिघळली आहे.’पाकिस्तानला चर्चेत सहभागी करापुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला भेट द्यावी, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल बदलण्यात यावा आणि समस्येशी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, असे तीन मुद्दे मेहबुबा यांच्या योजनेत आहेत. या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात यावे, असाही मेहबुबा यांचा आग्रह आहे. काश्मीर प्रश्नाला भू-राजकीय बाजू आहेत. यामुळे फुटीरवादी गट आणि पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घेण्याची सूचना मेहबुबा यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. काश्मिरींना पाकिस्तान नकोचकाश्मीरमधील लोकही अस्थैर्य, अशांतता, संचारबंदी, हिंसाचार या साऱ्याला कंटाळून गेली आहे. राज्यातील ९५ टक्के लोक या साऱ्याच्या विरोधात असून, केवळ ५ टक्केच लोक गडबड करीत आहेत आणि पाकिस्तान त्या आगीत तेल ओतत आहे. काश्मीरचा आणि पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही. काश्मिरी लोकांना पाकमध्ये जाण्याची वा वेगळे होण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या. संबंध सुधारण्याची संधी पाकिस्तान वारंवार गमावत आहे. राजनाथ सिंग यांच्याशी बोलण्याचे टाळून पाकने संधी गमावती. त्या आधी मोदी पाकला जाऊन आल्यानंतरही पाकने पठाणकोटवर हल्ला केला. मोदींकडून आशा आहे...दहशतवादी शक्तींना फुटीरांचा पाठिंबा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘असे पूर्वापार घडत आले आहे, पण आता नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची त्यांना पुरेपूर संधी आणि शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीरमध्ये बदल घडून आला नाही, तर मग कधीच काश्मीरची स्थिती सुधारणे शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदींकडून मला खूप आशा आहे.’पीडीपी-भाजपा सरकार वाजपेयी यांनी आखलेल्या धोरणानुसार काश्मीर प्रश्नावर काम करीत आहे. काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सध्याच्या स्थितीत कोणतेच स्थान नाही, असे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. हीच भूमिका पाकिस्तानने पुढे चालवावी. - मेहबुबा मुफ्ती