शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 11:30 IST

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे.

लखनऊ : जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामियामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठच्या कॉलेजमध्ये सीएएच्या बाजुने बसले आहेत. जर या विद्यापीठांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू-एएमयूचा इलाजच करून टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. 

पशूपालन, डेअरी आणि मत्स्य पालन राज्यमंत्री बालियान यांनी सांगितले की, पाकिस्तानातून जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंबे आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मलाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, जेव्हा या कुटुंब प्रमुखांशी बोलणे झाले तेव्हा समजले. एका प्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानात कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या मुलींना जबरदस्ती उचलून नेले जाते. अशा प्रकारे पिडीत कुटुंबांना जर भारतात नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करत आहेत, असे बालियान म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, मोदी यांनी चांगले काम केले आहे, ते या लोकांना पटलेले नाही. भारताचे तुकडे तुकडे करणारे सुधारले तर देशासमोर कोणीही टीकू शकणार नाही. सीएएचा विरोध करणाऱ्यांना जेव्हा मिडीयाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे कशी होती. कोणाला काहीच माहिती नव्हते. षड्यंत्र रचत य़ा लोकांच्या हातात दगड दिले गेले होते. 

बालियान यांच्या भाषणावेळी राजनाथ सिंहही व्यासपीठावर होते. त्यांच्याकडे पाहूनच ''तुम्हीच काहीतरी करू शकाल, पश्चिमी विद्यार्थ्यांसाठी जर 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-एएमयूचा इलाजच करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRajnath Singhराजनाथ सिंहjnu attackजेएनयू