शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:39 IST

हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, २२ जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचण्यासाठी रामभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाले आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षांची आणि प्रतिक्षेचं फलित म्हणजे २२ जानेवारीचा सोहळा आहे. राम मंदिर उभारणीसाठी कारसेवा दिलेल्या रामभक्तांसाठी या सोहळ्याचं वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे, कुणी पायी, कुणी दुचाकीवर, कुणी रेल्वेने, तर कोणी विमानाने अयोध्येतील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहे.  हैदराबादमधील एका रामभक्ताने  हजारो  किमीचा पायी प्रवास करुन अयोध्येची वाट धरली आहे. चल्ला श्रीनिवास शास्त्री असं त्यांचं नाव असून ते ६४ वर्षांचे आहेत. 

हैदराबाद ते अयोध्या असा  हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. आपल्या डोक्यावर सोन्याच्या पादुका ठेऊन त्यांची ही यात्रा सुरू झाली आहे. या पादुकांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे, या पादुकांची किंमत ६४ लाख रुपये आहे. यापूर्वी शास्त्रींनी चांदीच्या ५ वीटा राम मंदिरासाठी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. ते रामेश्वरम मार्गाने अयोध्येची यात्रा करत आहेत. आपल्याकडील सोन्याच्या चरण पादुका ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देणार आहेत.  

आपल्या पायी यात्रेत प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले, त्या प्रत्येक शिवलिंगाचे दर्शन घेऊनच ते पुढे प्रवास करणार आहेत. २० जुलै रोजी त्यांनी आपली अयोध्या यात्रा सुरू केली होती. मात्र, मध्येच त्यांना युकेला जावे लागले. त्यामुळे, त्यांची यात्रा थांबली होती. मात्र, तेथून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा यात्रा सुरू केली. सध्या ते, उत्तर प्रदेशपासून २७२ किमी दूर चित्रकूट येथे आहेत. ओडिशातील पुरी, महाराष्ट्रातील त्र्यंबक, गुजरातचे द्वारका मंदिरात दर्शन करुन ते अयोध्येला पोहोचत आहेत. पुढील १० दिवसांत अयोध्येत पोहोचण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. त्यांच्यासोबत त्यांचे ५ सहकारीही आहेत. 

शास्त्री यांच्या वडिलांनी अयोध्येसाठी कारसेवा केला होती. ते हनुमानाचे निस्सीम भक्त होते. अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे, अशी त्यांनी मनोकामना होती. त्यामुळे, वडिलांची इच्छा पूर्तीसाठी मी अयोध्येची वारी करत असल्याचं शास्त्रींनी सांगितलं. शास्त्री हे अयोध्या भाग्यनगर फाऊंडेशनचे संस्थापकही आहेत. अयोध्येत घर घेऊन तिथेच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याhyderabad-pcहैदराबादRam Mandirराम मंदिर