शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
3
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
4
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
5
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
6
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
7
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
8
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
9
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
10
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
11
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
12
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
13
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
14
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
15
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
16
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
17
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
18
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
19
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
20
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या

Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 5:01 PM

Covid-19 च्या 'टेन्शन'मध्ये भारतीयांसाठी आली दिलासा देणारी बातमी!

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 11 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील एकूण 14 राज्यांमध्ये रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. काही आठवड्यांत, संसर्गाचे प्रमाण सुमारे चार पटीने वाढले आहे. दिल्लीतील दोन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर १३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही थोडे वाढले आहे. देशात दररोज पॉझिटिव्हीटी रेटही वाढत आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचा दर अजूनही ९९ टक्क्यांच्या जवळ आहे. पण कोविडच्या प्रकरणांमध्ये दररोज होणारी वाढ चिंता वाढवत आहे. अशातच तज्ज्ञांनी दिलासादायक गोष्ट सांगितली आहे.

जाणकारांनी दिला दिलासा

कोविडच्या शेवटच्या तीन लाटांमध्येही, जेव्हा प्रकरणे वाढली, तेव्हा काही महिन्यांनंतर कोरोनाने उच्चांक गाठला होता. तिसर्‍या लाटेत उच्चांक (पीक) फार लवकर गाठला गेला नाही. त्या लाटेत ना हॉस्पिटलायझेशन झाले, ना मृत्यूच्या घटना वाढल्या. तज्ज्ञ सांगतात, "यावेळी वाढणारी प्रकरणे ही नवीन लाट मूळीच नाही. कोविडच्या प्रकरणांमध्ये असलेली छोटीशी उडी आहे, जी काही दिवसांनी कमी होईल." दिल्लीतील एमडी मेडिसिन आणि कोविड तज्ज्ञ डॉ. कवलजीत सिंग म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण काही दिवस वाढतील. सध्या संसर्ग पसरत आहे. पुढील काही दिवस केसेस वाढतील. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्याच्या सुरूवातीस, प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत केसेस नक्कीच वाढतील, पण त्यांचा वेग कमीच राहील. ज्यांना आधीच गंभीर आजार आहे किंवा जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांनाच जास्त संसर्ग होईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी."

डॉ. सिंग म्हणतात, "व्हायरसचा पॅटर्न तीन महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही प्रकरणे तशीच वाढत होती. या वेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीने लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत. यादरम्यान त्यांची कोविड चाचणीही केली जात आहे. त्यामुळे कोविडची आणखी प्रकरणे समोर येत आहेत."

घाबरण्याची गरज नाही!

AIIMS नवी दिल्ली येथील मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या मते, "कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी घाबरण्यासारखे काही नाही. देशात कोविड विरुद्ध पाळत ठेवणारी यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे जरी लोकांना कोविडला हलके न घेण्याचा आणि प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी त्याचा परिणाम फार घातक नाही. पण असे असले तरी मास्क वापरण्याची खात्री करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत