शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

खुशखबर! सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ

By admin | Published: November 02, 2016 12:21 PM

सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.

ऑनलाइन लोकमत
 हैदराबाद, दि. 2 -  गेल्या काही काळात इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मोठमोठ्या कंपन्यांपासून वैयक्तिक पातळीवरही इंटरनेटचा वापर अपरिहार्य झालाय. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबच सायबर सिक्युरिटीचे आव्हानही उभे राहिले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ राहणार आहे.
मोठ्या आणि लहान कंपन्यांसोबतच छोटे छोटे स्टार्ट अप उद्योजक देखील आता सायबर सिक्युरिटी कर्मचाऱ्याची नियुक्ती करू लागले आहेत. कंपन्यांबरोबरच अनेक ग्राहक स्वत:चा महत्त्वपूर्ण डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी डाटा सिक्युरिटी इंजिनिअरची मदत घेत आहेत. त्यामुळे डाटा सिक्युरिटीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे तेलंगणा माहिती तंत्रज्ञान असोसिएशनचे (टीआयटीए) संस्थापक सुदीप कुमार  माक्थाला यांनी सांगितले. 
('सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा')
सायबर सिक्युरिटी पदवी असणाऱ्यांच्या पगाराची सरासरीही इतर  क्षेत्रातील इंजिनिअर्सपेक्षा अधिक आहे. सायबर सिक्युरिटीची पदवी घेणाऱ्या फ्रेशर्सना 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर अन्य क्षेत्रात मिळणाऱ्या पगाराची सरासरी ही 2.5 लाख ते 3.6 लाख एवढी आहे. 
(पाकचे आता सायबर अटॅक, आयटी कंपन्यांना लक्ष्य)
"सायबर सुरक्षेसाठी स्वयंचलित सायबर सिक्युरिटी यंत्रणा उपलब्ध असली तरी ती सिक्युरिटी तज्ज्ञासाठी पर्याय ठरू शकत नाही. कारण सायबर गुन्हेगारांकडून अललेला धोका दररोज नवनव्या रूपात आपल्या समोर येत असतो.  तो मालवेअर किंवा व्हायरसच्या स्वरूपात असू शकतो.  त्यामुळे  त्याच्यावर सातत्याने नजर ठेवावी लागते," असे एका आघाडीच्या आयटी कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.