शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता घरातून थेट सीटपर्यंत पोहोचणार सामान; नवीन सेवा सुरू

By देवेश फडके | Updated: January 28, 2021 18:02 IST

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देरेल्वेकडून प्रवाशांसाठी नवीन सेवाआता घरातून थेट सीटपर्यंत पोहोचणार सामानकोरोना काळात घेणार विशेष काळजी

मुंबई :भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेची ही सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय रेल्वे नेहमी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून प्रवाशांचे सामान रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा सामान उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वप्रथम ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्याचे ध्येय असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अॅपच्या माध्यमातूनही सेवेचा लाभ

विशेष बाब म्हणजे केवळ प्रवासामधील सामानच नाही तर एखादी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पार्सल म्हणून पाठवायची असल्यास ही सेवा वापरात येणार आहे.  या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

सामानाप्रमाणे शुल्क आकारणी

नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षण आणि सामानाची माहिती द्यावी लागणार आहे. प्रत्यक्ष ट्रेन निघण्यापूर्वी चार ते पाच तास आधी प्रवाशांच्या घरून सामान घेऊन थेट सीटपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनाप्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे. 

सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची काळजी

विमानतळांवरील सामानाप्रमाणे रेल्वेच्या सामानावरही बारकोड स्टीकर लावले जाणार आहेत. हे बारकोड स्कॅन करून प्रवाशांना सामान नेमके कुठे आहे, याची माहिती मोबाइलवर मिळणार आहे. कोरोना संकटामुळे सामानाचे सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेलाही आर्थिक फायदा होणार आहे, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेGujaratगुजरात