शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

Good News यंदा नाही पडणार दुष्काळ

By admin | Published: March 27, 2017 1:39 PM

पावसाळयाच्या एक दोन महिने आधी जाहीर होणा-या पावसाच्या अंदाजावर सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेती पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळयाच्या एक दोन महिने आधी जाहीर होणा-या पावसाच्या अंदाजावर सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. पावसावर पीकपाणी अवलंबून असल्याने चांगला पाऊस व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. 
 
'स्कायमेट' या हवामानविषयक संस्थेने यंदाच्या पावसाचे अंदाज जाहीर केले आहेत. स्कायमेटने वर्तवलेला अंदाज शेतकरी आणि राज्यकर्त्यांना दिलासा देणारा आहे. यंदा सामान्यपेक्षा मान्सूनचे प्रमाण कमी राहणार असले तरी, 95 टक्क्यांपर्यंत मान्सूनचा पाऊस होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे. 
 
मागच्यावर्षी पेक्षा पावसाचे हे प्रमाण कमी आहे. पण त्यामुळे दुष्काळ पडण्याचा धोका नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात संपूर्ण देशात 887 मिमी पाऊस कोसळेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून नेहमीच पावसाने नरेंद्र मोदी सरकारची चिंता वाढवली आहे. 
 
पंतप्रधान म्हणून काम करताना नरेंद्र मोदींना पहिल्यावर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागला होता. 2014 मध्ये  पाचवर्षातील नीचांकी पावसाची नोंद झाली होती. 12 टक्के पावसाची तूट राहिली होती. त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा मान्सूनच्या पावसाने दगा दिला.
 
अल निनोच्या घटकाच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावर्षी 86 टक्के पाऊस झाला. 
मागच्यावर्षी 2016 मध्ये 97 टक्के समाधानकारक पाऊस झाला. कमी पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच बसत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही किंमत मोजावी लागते.