शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्ष पिकाला चांगला वाव : गायकवाड

By admin | Published: September 18, 2016 12:01 AM

चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ

चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ नाशिक : देशभरात होणार्‍या द्राक्षाच्या उत्पादनापैकी केवळ १० टक्केच द्राक्षांची परदेशात निर्यात होते, तर नव्वद टक्के द्राक्षांची देशांतर्गत विक्री केली जाते़ शेतकरी निर्यातक्षम द्राक्षासाठी जशी मेहनत घेतात तशीच मेहनत देशांतर्गत विक्रीसाठीच्या द्राक्षासाठी घेतल्यास शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ऑक्टोबर छाटणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़गायकवाड म्हणाले की, परदेशात निर्यात करणारी द्राक्षांची गुणवत्ता ही चांगली असावी लागते़ अर्थात त्यासाठी काही देशांमध्ये चांगले वाण विकसित करण्यात आले असून, या वाणांची आयात करून आपणही निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करू शकतो़ तसेच परदेशात निर्यातीसाठी द्राक्षे कडक, गोड असणे गरजेचे असते़ शेतकर्‍यांनी द्राक्षांच्या उत्पादन घेताना प्रमाणित कंपन्यांच्याच किटकनाशकांचा वापर करणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी सहसंचालक कैलास मोते, कृषी अधिकारी टी़ एऩ जगताप, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, प्रकल्प संचालक अशोकराव कांबळे, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, आदि उपस्थित होते़ यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़या चर्चासत्राच्या उद्घाटनसत्रानंतर द्राक्षबागेतील रोग व्यवस्थापन, द्राक्षबागेतील विस्तार व मालाचे व्यवस्थापन, द्राक्षबागेतील कीड नियंत्रण, द्राक्षबागेतील जमीन, खत व्यवस्थापन व संजीवकांचा वापर या विषयांवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ़ एस़ डी़ सावंत, डॉ़ ए़ के़उपाध्याय, डॉ़ आऱ जी़ सोमकुवर, डॉ़ एस़ डी़ रामटेके, डॉ़ दीपेंद्र सिंग यादव आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)