शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण - आरोपी डॉक्टर काफिल खानला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:24 IST

गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) गेल्या महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिला खानला अटक करण्यात आली आहे.

लखनऊ, दि. 2 - गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) गेल्या महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिला खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात फक्त सहा दिवसांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला होता. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन थांबवण्यात आल्याने 30 मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. 

या धक्कादायक घटनेनंतर डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल एज्युकेशन के के गुप्ता यांनी 23 ऑगस्ट रोजी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली होती. तपास पुर्ण झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट सादर केला होता. यानंतर वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.

याआधी निलंबित करण्यात आलेले बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ पुर्णिमा यांना आधीच अटक करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.डॉ काफिल यांच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली होती.

मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५^^६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली होती.

गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवजात शिशू अति दक्षता कक्षात उपचारासाठी आणले जाते. यात मुदतपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची, कावीळ आणि अन्य संसर्गजन्य आजारी असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना तर अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले होते. 

२०१७ मध्ये १,२५६ जणांचा मृत्यूऑगस्ट २०१७ मध्ये कोणत्या रुग्ण कक्षात किती बालके दगावली, याचा तपशीलही त्यांनी दिला होता. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी ३७ बालकांचा मृत्यू झाला. यापैकी २६ बालक नवजात शिशू आयसीयूत आणि ११ मुले मेंदुज्वर उपचार कक्षात मरण पावली.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूरhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCrimeगुन्हा