शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अबकी बार,निजता पर वार!; विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:08 IST

एजन्सी एकप्रकारे गुप्तहेराचेच काम करणार असून त्या कधीही तुमच्या कम्प्युटरमधील डाटा तपासू शकतात. त्यामुळे तुमच्या मालकीचा जरी कम्प्युटर असला तरी याचा वापर जरा जपून करावा लागणार आहे. 

नवी दिल्ली : आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील दहा बड्या एजन्सींना तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या एजन्सी एकप्रकारे गुप्तहेराचेच काम करणार असून त्या कधीही तुमच्या कम्प्युटरमधील डाटा तपासू शकतात. त्यामुळे तुमच्या मालकीचा जरी कम्प्युटर असला तरी याचा वापर जरा जपून करावा लागणार आहे. 

दरम्यान, या निर्णयामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'अबकी बार निजता पर वार', असे म्हणत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, निवडणुकीतील पराभवानंतर मोदी सरकार आता कम्प्युटरमधील जाजूसी करणार आहे. कंप्युटरवर वॉच ठेवण्यासाठी सरकारने दहा एजन्सी नियुक्त करून व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा यावरुन मोदी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. 'मे 2014 पासून भारत अघोषित आणीबाणीतून जात आहे. गेल्या महिन्यात मोदी सरकारने सर्व सीमापार केल्या आहेत. आता लोकांच्या कम्प्युटरपर्यंत नियंत्रण आणले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील मूलभूत अधिकारांचे अशाप्रकारे हनन स्वीकारले जाणार आहे का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

याचबरोबर, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या निर्णयावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

(परवानगीशिवाय कम्प्युटरवर सरकारची नजर, 10 तपास यंत्रणा ठेवणार पहारा)

या एजन्सी ठेवणार तुमच्या कम्प्युटरवर नजर... - सीबीआय, आयबी, एनआयए, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सक्तवसुली संचनालय, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, रॉ, दिल्ली पोलीस आयुक्त, डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स (जम्मू-काश्मीर, उत्तर-पूर्व आणि आसामसाठी).

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी