शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
3
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
4
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
5
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
6
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
7
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
8
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
9
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
10
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
11
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
12
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
13
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
14
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
15
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
16
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
17
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
18
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
19
Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!
20
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सरकारी बँकांचं होणार विलीनीकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:48 AM

सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19- सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे. या संदर्भात सरकार एका योजनेवर काम करत आहे. त्यानुसार बँकांची संख्या मर्यादित ठेवून त्यातून किमान तीन ते चार जागतिक दर्जाच्या बँका उभारण्याचा केंद्राचा हेतू असल्याची माहिती मिळते आहे.
 
गेल्याच महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकांच्या एकत्रिकरणावर काम सुरू असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी, या विषयीचा सविस्तर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला होता. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलीनीकरण यशस्वी झाल्यानंतर अर्थ मंत्रालय आणखी एका मोठ्या विलीनीकरणावर विचार करीत आहे. मात्र, सध्या सरकारी बँकांवर असणारा थकीत कर्जाचा बोजा हलका केल्यानंतरच विलीनीकरणाचा विचार करण्यात येणार आहे.  बँकांचं अधिग्रहण करताना मोठ्या बँकांना छोट्या बँकांची कर्ज, मनुष्यबळ, भौगोलिक स्थिती हे घटक लक्षात घ्यावे लागणार आहेत. 
आणखी वाचा
 

अदानी समूहाच्या इशा-यानंतर EPW च्या संपादकांचा राजीनामा

"कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अ‍ॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर

संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी

सध्या अस्तित्वात असलेल्या २१ बँकांचं विलिनीकरण करून त्यांची संख्या १२ करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानंतर तीन बँकांची एक बँक याप्रमाणे जागतिक दर्जाच्या चार बँकांच्या निर्मितीची योजना आहे. या नव्या बँका भारतीय स्टेट बँकेइतक्या मोठ्या असतील. या शिवाय पंजाब अँड सिंध बँक आणि आंध्र बँक या बँका स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. शिवाय काही मध्यम आकाराच्या बँकांचेही स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका आणि महिला बँकेचे एक एप्रिल २०१७ रोजी स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया आदी बँकांकडून अधिग्रहणासाठी तयार असलेल्या बँकांचा शोध सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.