शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 12:59 IST

केंद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत 1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत.

केंद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत 1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. हे मोबाईल नंबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित होते. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आर्थिक सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत बैठक झाली.

एपीआय (एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) इंटिग्रेशनद्वारे सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) प्लॅटफॉर्मवर बँका आणि आर्थिक संस्थांचा समावेश करण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

निवेदनानुसार, सीएफसीएफआरएमएस प्लॅटफॉर्म नॅशनल सायबर क्राइम इन्फॉर्मेशन पोर्टल (NCRP) शी जोडला जाईल. यामुळे पोलीस, बँका आणि आर्थिक संस्था यांच्यात चांगला समन्वय साधता येईल.

दूरसंचार विभागाने खूप एसएमएस पाठविणाऱ्या 35 लाख प्राथमिक युनिट्सचे विश्लेषण केलं. यापैकी 19,776 एसएमएस पाठवण्यात गुंतलेल्या संस्थांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. या संदर्भात 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून अंदाजे 3.08 लाख सिम ब्लॉक करण्यात आले आहेत. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, विशेषत: सायबर गुन्हेगार लोकांना कॉल करून फसवणूक करत आहेत.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. एसएमएस आणि ईमेलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका. तुमच्या बँक खात्याशी संबंधित पर्सनल माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. कोणताही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा मेलला रिप्लाय देऊ नका आणि त्यांना ब्लॉक करा. 

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन