शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

संसदेत दिलेल्या 70 टक्के आश्वासनांचा सरकारला विसर

By admin | Published: February 06, 2017 8:38 AM

केद्रीय मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी 70 टक्के आश्वासनं अजूनही पुर्ण झालेली नाहीत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - निवडणुकीत मोठमोठी आश्वासनं देऊन निवडणूक जिंकायची आणि जिंकल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचं ही राजकारण्यांची ठरलेली रणनीती. सत्तेत असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांना तर संसदेत दिलेल्या आश्वासनांचाही विसर पडलेला आहे. केद्रीय मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी 70 टक्के आश्वासनं अजूनही पुर्ण झालेली नाहीत. फक्त 30 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचं समोर आलं आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. आता त्यांनी सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केलं आहे, की ती पुर्ण करायला वेळ मिळाला नाही हे त्यांनाच माहित. 
 
(तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल)
 
दिलेल्या आश्वासनांपैकी फक्त 29 टक्के आश्वासनांवर अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र अपुर्ण आश्वासनांची यादी जास्तच मोठी आहे. अहवालानुसार प्रत्येक आश्वासन पुर्ण झालं की नाही याची जबाबदारी संबंधित मंत्री तसंच खात्याशिवाय लोकसभेच्या 15 सदस्यीस स्थायी समितीचीही असते. मात्र यानंतरही इतकी आश्वासनं अपुर्ण राहिली आहेत. 
 
तीन महिन्यांचा मिळतो कालावधी - 
संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री नंतर संपुर्ण माहिती पुरवण्याचं आश्वासन देतात. कोणत्याही चर्चत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरही विचार केला जाईल असं आश्वासनही हमखास दिलं जातं. यामधील अनेक मुद्दे विकासाशी संबंधित असतात. व्यक्तिगत आश्वासनं वगळता इतर आश्वासनं पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबधित मंत्रालय तसंच खात्याची असते. तसंच हे आश्वासनं तीन महिन्यात पुर्ण होईल याची खात्रीही मंत्रालयाला घ्यायची असते. संसदेत दिलेल्या आश्वासनाचं पुढे काय झालं, याचा आढावाही संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत घेतला जातो.
 
सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर देखदेख करण्यासाठी लोकसभेच्या 15 सदस्यांची स्थायी समिती आहे. पूर्तता न झाल्यास ही समिती गरज भासल्यास संबंधित मंत्रालयाच्या किंवा खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून विलंबाची कारणं विचारते.परंतु ही समिती असूनही फक्त 30 टक्केच आश्वासनांची पूर्तता झालेली आहे.