शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास दहा हजारांचा दंड, युपी सरकारकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:56 IST

या आदेशानुसार, आता दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल तर एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

ठळक मुद्देड्रायव्हिंग लायसन्सबाबत चुकीची माहिती दिल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.अग्निशमन दलाच्या गाडी व रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशात आता गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे चांगलेच महाग पडणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास पहिल्यांदा एक हजार आणि दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. उत्तर प्रदेश मोटार वाहन नियमावलीनुसार वाढीव दरावर दंड आकारण्याचा आदेश गुरुवारी देण्यात आला.

या आदेशानुसार, आता दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल तर एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पार्किंगच्या उल्लंघनासाठी पहिल्यांदा ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच, सीट बेल्टशिवाय कार चालविली तर एक हजार रुपये आणि विना परवाना गाडी चालविली किंवा १४ वर्षांखालील मुलांनी वैध परवान्याशिवाय चालविली तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

याचबरोबर, याआधी अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकले नाही आणि कामात अडथळा आणल्याबद्दल एक हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता तो वाढवून दोन हजार रुपये केला आहे. याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन्सबाबत चुकीची माहिती दिल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच, अग्निशमन दलाच्या गाडी व रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

याशिवाय, सुसाट म्हणजेच वेगाने कार चालविली तर दोन हजार रुपये तर व्यावसायिक वाहनांना चार हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अपंग व्यक्तीला गाडी चालवताना पहिल्यांदा एक हजार आणि दुसऱ्यांदादंड दोन हजार रुपये असेल. दुचाकीवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त जण प्रवास करत असतील तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दोन हजार रुपये दंड ठोठावला जाईल. जर तुम्हाला पहिल्यांदा विनाविमा वाहन चालविताना पकडले गेले तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा चार हजार रुपये दंड ठोठावला जाईल. राज्य सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी नियम कठोर केले आहेत.

या नियमांनुसार, वाहनाचे मॉडेल बदल्यानंतर निर्माता आणि डीलरला प्रति वाहन एक लाख दंड भरावा लागेल. मोटार वाहनाच्या नियमांविरोधात वाहन मालकाने वाहन बदलल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही शर्यतीत किंवा चाचणीत भाग घेण्यासाठी पहिल्यांदा पाच हजार द्यावे लागतील. तसेच, जर परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या शर्यतीत किंवा चाचणीत भाग घेतल्यास तुम्हाला दहा हजाक रुपये दंड भरावा लागेल. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याबद्दल एका व्यक्तीला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtraffic policeवाहतूक पोलीस