शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:42 IST

Priyanka Gandhi : अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.

नवी दिल्ली :अलिगढ दारूकांडाला योगी आदित्यनाथ सरकार आणि दारू माफियांदरम्यानचे संगनमत जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी केला आहे.अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.फेसबुकवरील पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, सरकार आणि दारू माफियांच्या संगनमतामुळे अलिगढमध्ये ही शोकांतिका घडली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन आणि औषधी उपलब्ध होत नव्हती. कामधंदे बंद होते. परंतु, प्रशासन आणि दारू माफियांच्या साटेलोट्यामुळे राज्यांत व्यवसायाची भरभराट होत होती.उत्तर प्रदेश काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी या भीषण घटनेविरुद्ध आवाज उठवून या घटनेस जबाबदार असलेल्या सरकारमध्ये बसलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.दरम्यान, त्यांनी आग्रा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मॉक ड्रीलदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला केला. या प्रकरणाचे तथ्य समोर आणून सरकार दोषींना शिक्षा करणार का? असा सवाल त्यांनी ट्विटवर केला आहे

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश