शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

By admin | Published: June 27, 2016 4:17 AM

(एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती.

नवी दिल्ली : अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती. या गटाचा सदस्य बनून भारत काही मिळविण्याऐवजी गमावणारच होता. सरकारमध्ये बसलेले लोक याबाबत दररोज दिशाभूल करीत आहेत, असे सांगत माजी विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.भारताने एनएसजीचे सदस्यत्व स्वीकारू नये हे मी ठामपणे सांगत आहे. आपल्याला जे हवे ते आधीच मिळाले आहे, असे ८३ वर्षीय सिन्हा यांनी स्पष्ट केले. भारताने सदस्यत्व मिळविण्यासाठी खूपच उत्सुकता आणि न मिळाल्यामुळे निराशा दर्शविली. त्याची काहीही आवश्यकता नाही. भारत एनएसजीच्या बाहेरच योग्य आहे. आपण सदस्य बनल्यास नुकसानच जास्त आहे. आपल्याला कोणताही लाभ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) >एनएसजी सदस्यत्वाच्या भारताच्या आशा पल्लवितअण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या भारतासारख्या देशांना प्रवेश देण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी अणु पुरवठादार समूहाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांची या वर्षाअखेर पुन्हा एक बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे ४८ सदस्यीय एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याबाबतच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तूर्त एनएसजीचे सदस्यत्व मिळाले नसले तरी आम्ही प्रयत्न सुरुच ठेवू. संबंध सुधारायचे असतील तर उभय देशांना परस्परांचे हित, चिंता व अग्रक्रम जपावे लागतील, हे चीनला पटवून देत राहू.- विकास स्वरूपसरकारला मुद्दा समजला काय?सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हा मुद्दा समजला की नाही ते माहीत नाही, मात्र सरकारमध्ये असे लोक बसले आहेत की ते सरकारची दररोज दिशाभूल करीत आहेत, हे मला माहीत आहे, असेही सिन्हा यांनी नमूद केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत सिन्हा हे विदेशमंत्री राहिले होते. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधासह मोदी सरकारच्या विदेश धोरणासंबंधी विविध मुद्यांवर रोखठोकपणे मते मांडली.