शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सरकारी कार्यालयांत शुक्रवारी खादीचा पोषाख ?

By admin | Published: March 10, 2016 4:02 AM

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या

नवी दिल्ली : सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या फायद्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा एक भाग म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी खादीचे कपडे परिधान करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करावे, अशी विनंती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आयोगाच्या या विनंतीवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.‘देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे परिधान करावेत,’ असे आवाहन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी केले आहे. तथापि खादीचा पोषाख परिधान करणे ऐच्छिक असेल. खादीची विक्री वाढविण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. प्रत्येकाने खादीचा एक पोषाख जरी खरेदी केला तरी विक्री किती वाढेल, असा त्याचा उद्देश आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्याचे प्रतिपादन अनेकदा केले आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली आहे. देशात केंद्र सरकारचे ३५ लाख कर्मचारी असून, त्यात रेल्वे व संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना समावेश नाही. आठवड्यातून एक दिवस खादी परिधान करण्याची कल्पना फार चांगली असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. काही अधिकारी सध्या खादीचे कपडे घालतात, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र कपड्यांबाबत सरकारने सक्ती करू नये, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरुपांचे कपडे वा महिलांच्या साड्या वा पंजाबी सुट विकत घेणे, त्यांना स्टार्च घालणे, इस्त्री करणे खर्चीक असल्याची तक्रार काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, फॅब इंडिया आणि रेमंड यांसारख्या कंपन्यांशी खादी आणि ग्रामोद्योग आयोग करार करीत आहे. या करारानंतर अशा कंपन्यांच्या शोरूममध्ये खादीचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. (वृत्तसंस्था)