शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:00 IST

काँग्रेसच्या प्रश्नाला राजनाथ सिंह यांचं उत्तर

 नवी दिल्ली: काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता. तर मग काश्मीरमधील स्थिती आज अशी का?, असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काश्मीरमधील स्थितीवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर राजनाथ सिंह यांनी आझाद यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोगानं सूचना केली, तर लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होईल, असंही सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी गुलाम नबी आझाद यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस आणि भाजपा सरकारची तुलना केली. 'काँग्रेसनं जम्मू-काश्मीरचा विकास केला. मग आज तिथली परिस्थिती अशी का?' असा प्रश्न सिंह यांनी विचारला. 'पंतप्रधान मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं. मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरला जितका निधी देण्यात आला, तितका याआधी कधीही देण्यात आला नव्हता. आमच्या सत्ताकाळात दहशतवादी घटना कमी झाल्या. राज्यात शांतता नांदावी, यासाठी आम्ही हुर्रियतशी बोलायलादेखील तयार होतो. मात्र त्यांनी बातचीत करण्यास नकार दिला,' असं सिंह यांनी सभागृहाला सांगितलं.भाजपा सरकार निवडणूक आयोगाला लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यायला सांगणार का, असा प्रश्न राजनाथ सिंह यांना गुलाम नबी आझाद यांनी विचारला. त्यावर निवडणूक आयोगानं सूचना दिल्यास सरकारला दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यात काहीही अडचण येणार नाही, असं उत्तर सिंह यांनी दिलं. गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपानं जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. यानंतर नोव्हेंबरमध्ये पीडीपीनं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्याआधीच विधानसभा विसर्जित केली.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPDPपीडीपीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक