शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:11 IST

भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, एकदा नियम ठरवले जातात.ते पुन्हा मध्येच दलले जाऊ शकत नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकरी भरतीच्या नियमांबोबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 'सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम आधीपासून जे ठरवले आहेत, त्यात बदल करता येणार नाही, असं न्यायलयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, एकदा भरतीचे नियम ठरवले जातात, ते पुन्हा बदलले जाऊ शकत नाहीत. निवडीचे नियम अनियंत्रित नसावेत पण ते घटनेच्या कलम १४ नुसार असावेत. 

सर्वोच्च न्यायालयाने एकमताने सांगितले की, पारदर्शकता आणि भेदभाव न करणे हे सार्वजनिक भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य असले पाहिजे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा, न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही या घटनापीठात समावेश होता.

यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."

या निर्णयामागील प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. २०१३ मध्ये अनुवादक पदाच्या भरतीदरम्यान, राज्य सरकारने काही नियमांमध्ये बदल केले होते, यामध्ये असे म्हटले होते की, केवळ तेच उमेदवार नियुक्तीसाठी पात्र मानले जातील ज्यांनी लेखी आणि तोंडी ७५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. आधीच परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर हा निर्णय लागू करण्यात आल्याने भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता.

सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, यासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि न्याय्य असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, न्यायमूर्ती पमीघंटम नरसिंहा, न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती मनोज कुमार मिश्रा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने कोणत्याही भरती प्रक्रियेच्या मध्यभागी उमेदवारांची पात्रता किंवा पात्रता बदलणे समर्थनीय नाही, असं म्हंटले आहे.

कोणत्याही भरती प्रक्रियेत, प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जे नियम लागू होते तेच नियम सरकारने पाळले पाहिजेत, असेही या निर्णयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे उमेदवारांचे हक्क आणि निःपक्षपातीपणाचे रक्षण करण्याचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. भरतीमध्ये पारदर्शकता असावी, जेणेकरून पक्षपात किंवा अनियमितता होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयjobनोकरी