शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:19 IST

संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे

नवी दिल्ली - गांधी परिवाराच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात तसेच संसदेत गाजत असताना प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्ट करत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, प्रियंका, माझी मुले, गांधी परिवार असो वा मी स्वत: यांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही. हा मुद्दा आहे की, आपल्या देशातील नागरिक, विशेषत: महिलांना सुरक्षित ठेवणं अथवा त्यांना सुरक्षित वाटावं असं आहे. संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे. मुलींसोबत छेडछाड, बलात्कार होत आहेत. आपण कोणता समाज बनवतो आहोत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. जर आम्ही आमच्या देशात, आमच्या घरात, रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा सुरक्षित नाही अथवा रात्री सुरक्षित नाही तर आम्ही कुठे आणि केव्हा सुरक्षित आहोत? अशी भावना रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली आहे. 

एका आठवडाभरापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता अज्ञात व्यक्तींनी सेल्फी घेण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या घरात प्रवेश केला. २६ नोव्हेंबरला २ वाजता त्यांच्या घराच्या आवारात एक अज्ञात गाडीने शिरकाव केला. त्यातून काही जण उतरले होते. माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या घराच्या आवारात ३ महिला, १ पुरुष आणि १ लहान मुलाने प्रवेश केला होता. 

घरात आलेल्या त्या लोकांनी सांगितले की, आम्ही प्रियंका गांधी यांचे चाहते आहोत. त्यांची भेट घेण्यासाठी आलोत. मात्र सीआरपीएफने याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ पोलिसांवर आहे. 

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटविल्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावर पलटवार करताना अमित शाह यांनी सुडाचे राजकारण करणे हे भाजपाच्या संस्कारांध्ये नाही, तर ती काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत हल्लाबोल केला होता. आतापर्यंत एसपीजी सुरक्षेच्या नियमांमध्ये जे बदल झाले होते. ते फक्त एका कुटुंबाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांची सुरक्षा पाहून बदल करण्यात येत आहे. एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आहे. याचा प्रतिष्ठेचं प्रतिक (status symbol) म्हणून वापर होणार नाही, असे सांगत अमित शाह यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता टोला लगावला. याचबरोबर, आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच ही सुरक्षा मिळेल. शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त ५ वर्ष ही सुरक्षा दिली जाईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राAmit Shahअमित शहाPriyanka Gandhiप्रियंका गांधीWomenमहिलाRapeबलात्कार