शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

"गाय आमची माता, सरकारने प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढावं"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:43 IST

गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे.

Swami Avimukteshwaranand Saraswati : महाराष्ट्र सरकारने नुकताच देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव मान्य करून जीआर जारी करण्यात आला. अशातच आता बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारकडे गायींसंदर्भात एक मागणी केली आहे. गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे. गायीला जनावर म्हणणं चुकीचं असल्याचेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे गौ प्रतिष्ठा ध्वज स्थापन करण्यासाठी भारत भेटीदरम्यान ओडिशामध्ये पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी  गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. सरकारी यादीत गाय हा प्राणी आहे, पण सनातन धर्मात गायीला आईचा दर्जा आहे. त्यामुळे गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळ्यात यावं असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे दीर्घकाळापासून गायींच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. 

"सरकारी यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीत गायीला देवी म्हटले गेले आहे. गायीला माता म्हणत तिचे महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्म मानणारे लोक गायीला गौ माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपणच पुढे नेली पाहिजे. यासाठी सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गाय वगळावी लागणार आहे," असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

"गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. राहीला मुद्दा गायींची सेवा करण्याचा, त्यांची चांगली काळजी घेण्याचा हे आमचे काम आहे. बाकी सरकारने आधी आपले काम करावे. सरकारने गायीला जनावरांच्या यादीत ठेवले आहे. त्यामुळे लोकही गाईला जनावरासारखे वागवतात," असेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

टॅग्स :cowगायCentral Governmentकेंद्र सरकार