शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी

By admin | Published: July 20, 2015 1:52 AM

व्यापमं घोटाळा, ललित मोदी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी कंबर कसली असतानाच विरोधकांचे मनसुबे हाणून

नवी दिल्ली : व्यापमं घोटाळा, ललित मोदी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी कंबर कसली असतानाच विरोधकांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सज्ज झाले आहेत. विरोधकांचा एकजुटीने मुकाबला करण्याची रणनीती आखण्याच्या दृष्टीने उद्या सोमवारी मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अशी बैठक प्रथमच होत आहे.येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचे काँग्रेससह विरोधकांचे मनसुबे आहेत. यासाठी सुषमा स्वराज व स्मृती इराणी यांना हटविण्याच्या मागणीशिवाय शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंह या भाजपाशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना केलेल्या मदतीवरून वांध्यात सापडल्या आहेत, तर मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावर विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. विरोधकांच्या या डावपेचांना मात देणारी रणनीती आखण्यासाठी सरकारनेही याच प्रयत्नांतर्गत नवी रणनीती आखण्याच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी रालोआच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलवली आहे.