शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष, जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे; राहुल गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:08 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली: राज्यसभेने 'नारी शक्ती वंदन विधेयक' मंजूर केले, ज्यात संसद आणि राज्य विधानसभांच्या कनिष्ठ सभागृहात महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. विधेयक मंजूर झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ सभागृहात उपस्थित होते. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने २१५ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही. याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले. 

'नारी शक्ती वंदन विधेयक' कायदा झाल्यानंतर, ५४३ सदस्यांच्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या सध्याच्या ८२ वरून १८१ वर जाईल. राज्य विधानसभेतही महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव असतील. 'नारी शक्ती वंदन विधेयक' मंजूर झाल्यानंतर भाजप महिला मोर्चाने आज भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात पोहोचल्यावर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. याचवेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

मोदी सरकारकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच मतदार विभाग आणि जनगणनाबाबतचे कलम काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. आरक्षण आजच लागू केले जाऊ शकते. ही काही गुंतागुंतीची बाब नाही, पण सरकारला हे करायचे नाही. सरकारने ते देशासमोर मांडले आहे. तसेच १० वर्षांनंतर त्याची अंमलबजावणी होणार असून ती नक्की होईल की नाही, हे देखील माहिती नाही, असा निशाणा राहुल गांधींनी साधला. 

महिला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला, पण ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशात ओबीसींची संख्या किती आहे, हे कळायला हवे. एससी, एसटी, आदिवासी सचिव किती आहे, हे मोदींनी सांगावे. जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली. एकदा मी ठरवले की मी ते सोडत नाही. भारतात ओबीसींची टक्केवारी किती आहे, ती फक्त पाच टक्के आहे का, असेल तर ठीक आहे, नाहीतर मला शोधावे लागेल, असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले. 

आता विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल!

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने २१४ मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात एकही मत पडले नाही. हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे. त्यांची मंजुरी मिळताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि संसदेचे विशेष अधिवेशन संपले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWomen Reservationमहिला आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार