शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता युनिक आयडी मिळणार, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:56 IST

Farmers : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र (unique ID) देण्याच्या प्रक्रियेत सरकार सातत्याने काम करत आहे. आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला असून, त्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

या अनोख्या ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील, असे सरकारचे म्हणणे आहे. याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकणार आहे. यामुळे त्यांना कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही.

केवायएफद्वारे शेतकऱ्यांची पडताळणीओळखपत्र बनवण्याच्या योजनेत ई-नो युवर फार्मर्सद्वारे (ई-केवायएफ) शेतकऱ्यांची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे विविध योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी विविध विभाग आणि कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती लोकसभेत मागविण्यात आली होती. यावर नरेंद्र तोमर म्हणाले की, देशातील एकूण 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी साडेपाच कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. उर्वरित काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कल्याण निधी योजनेतून (पीएम-किसान) दरवर्षी दोन हजार रुपयांचे समान हप्ते तीन वेळा दिले जातात, त्या सर्व शेतकऱ्यांना या आयडीचा लाभ मिळेल.

योजनांचा लाभ घेणे होईल सोपे देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासोबतच कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक सीजनमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. ओळखपत्र बनवल्यानंतर त्यांना या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. दरम्यान, कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे होतात, ज्याचा गैरफायदा खोटे व फसवणूक करणारे घेतात. ओळखपत्र तयार झाल्याने अशा लोकांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतीशी संबंधित अनेक प्रकारची माहितीही या माध्यमातून खऱ्या शेतकऱ्यांना देता येईल. डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नामुळे कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल. 

टॅग्स :Farmerशेतकरी