शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

स्मार्ट शहराच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा ग्रीहा परिषद समारोप : गिरीश महाजन यांची अपेक्षा

By admin | Published: December 05, 2015 11:51 PM

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.
सातव्या प्रादेशिक ग्रीहा परिषदेचा शनिवारी येथील जैन हिल्सवर समारोप झाला. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आमदार किशोर पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अनीश शाह, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले प्रत्येकाने पाण्याचा जबाबदारीने वापर केला पाहीजे. शहरांमध्ये ३५ टक्के पाण्याची गळती होते. त्याही समस्येचा सामना आपल्याला करावयाचा आहे. शहरातील सांडपाण्यावर भविष्यात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचे संकट आपल्यापुढे आहे. जैन इरिगेशचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी देशाच्या शाश्वत विकासासाठी शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीय करण्याची गरज बोलून दाखविली. देशातील ६० टक्के लोक खेड्यात रहात असून शहरेसुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शहरांसोबत खेड्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीय करायला पाहीजे. जोपर्यंत मने आणि विचार स्मार्ट होणार नाहीत, तोपर्यंत स्मार्ट शहरे निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले.
विकासाची नांदी
स्मार्ट शहरांसंदर्भातील परिषद म्हणजे शहरासाठी भविष्यातल्या विकासाची नांदी असून शहर विकासासाठी आपण पुढाकार घेऊ असे मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले. भरत अमळकर यांचेही भाषण झाले. प्राचार्या वर्षा चोरडिया यांनी सूत्रसंचालन तर पूर्वा केसकर यांनी आभार मानले.
-----
फोटो कॅप्शन
ग्रीहा परिषद समारोप सत्रात बोलताना गिरीश महाजन. सोबत व्यासपीठावर अनीश शाह, भरत अमळकर, संजय कापडणीस, अतुल जैन, आमदार किशोर पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर.
फोटो नंबर ०६सीटीआर ५६ व ५७