शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवरदेवाच्या FB पोस्टनं सगळेच हादरले; कोणी माझी मदत करेल का? करतोय विनवणी, १८ जूनला लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:49 IST

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते

ठळक मुद्दे२२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोयघोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे.भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील बुंदेलखेडच्या महोबा जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. याच छळाला कंटाळून एका नवऱ्याने ज्याचं लग्न १८ जून रोजी होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांकडे मदतीची याचना केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, १८ जूनला माझं लग्न आहे आणि घोड्यावर बसून मला वरात काढायची इच्छा आहे. कोणी माझी मदत करू शकेल का? असं त्याने विचारलं आहे.

नवरदेवाच्या या सोशल मीडिया पोस्टनं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. स्वातंत्र्य भारतात आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी का नाही? असा संतप्त प्रश्न लोकं विचारू लागली आहे. ही सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. २२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोय. अलखरामचं लग्न १८ जून रोजी होणार आहे.

अलखराम ज्या गावात राहतो त्याठिकाणी दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. गावातील दबंग आणि उच्चवर्णीय लोक दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे घोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे. अलखरामच्या वडिलांनी महोबकंठच्या पोलीस ठाण्यात पत्र लिहून विनंतीही केली आहे.

महोबा जिल्ह्यातील महोबकंठ येथे माधवगंज नावाचं २ हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही दलित समाजातील नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही दलित कुटुंबाने याचा विरोध केला नाही कारण गावातील काही दबंग लोकांची दहशत या लोकांच्या मनात कायम आहे. गावातील संकुचित विचारधारेचे लोक आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. या गावातील वृद्ध लोक सांगतात कोणत्याही दलिताला घोड्यावर बसून वरात काढता येत नाही.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिसरातील गावात स्वातंत्र्यानंतरही कोणत्याही दलित नवरदेवाला घोड्यावर वरात काढणं दूरच पण कार, बाईकवरूनही नवरदेव गावातून निघू शकत नाही. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते. आता अलखरामच्या सोशल मीडिया पोस्टनं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परंतु काहीच करता येत नाही. मात्र भीम आर्मीनं यात उडी घेतली आहे. अलखरामची वरात घोड्यावरून काढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश