शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नवरी जोमात, नवरदेव कोमात! 'तो' हनिमूनची वाट पाहत होता; पैसे, दागिने घेऊन पळाली नववधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:28 IST

लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूने हनिमूनच्या दिवशी असं काही केलं ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूने हनिमूनच्या दिवशी असं काही केलं ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नवरीने  घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री ही घटना घडली. नवरदेव रात्री खोलीत वधूची वाट पाहत होता, परंतु नवरी पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळून गेली. 

नवऱ्याने आता न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पैसे आणि दागिने मिळावेत, अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालौन शहरातील एका आईला आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी होती. त्यानंतर मध्यस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधून 70 हजार रुपये घेऊन मुलाचं लग्न लावून देण्यास सांगितलं. मध्यस्थांनी त्याचं लग्न गोरखपूरची रहिवासी पूजासोबत ठरवलं.

गेल्या आठवड्यात पूजा जालौन येथे आली आणि एका मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर पूजा तिच्या सासरच्या घरी पोहोचली जिथे वराने तिचे आनंदाने स्वागत केलं. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. मग जेव्हा रात्र झाली तेव्हा तरुण हनिमूनची वाट पाहत होता. मात्र लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वधूने दागिने, रोख रक्कम घेऊन पळ काढला.

तरुणाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाचे लग्न लावून देण्याबाबत लखन सिंग आणि चरण सिंग या दोघांशीही बोलणं झालं होतं. लग्नाच्या बदल्यात त्यांनी 70 हजार रुपये घेतले होते. पण लग्नानंतर आता वधूच पळून गेली आहे. या प्रकरणी जालौन पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विमलेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. तक्रारीवरून लग्न झालेल्या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी