शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

28 किमी पायपीट करत नवरदेवाने गाठला मंडप; चालकांच्या संपाचा फटका, रात्रभर चालून पोहोचले वधूच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 9:22 AM

ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

भुवनेश्वर : ओडिशातील व्यावसायिक वाहनांच्या चालकांच्या संपाचा एका नवरदेवास चांगलाच फटका बसला. संपामुळे वाहनांची व्यवस्था न झाल्यामुळे नवरदेवासह सर्व वऱ्हाडी मंडळींना रात्रभर २८ किलोमीटर चालत-चालत नवरीच्या घरी पोहोचावे लागले. ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

कल्याणसिंहपूर तालुक्यातील सुनाखडी येथून हे  वऱ्हाड गुरुवारी रात्री पायी निघाले. रात्रभर चालून ते सकाळी दिबालापाडू येथे विवाहस्थळी पोहोचले. विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र, या वऱ्हाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वऱ्हाडाचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. (वृत्तसंस्था)

कशासाठी आहे संप?-ओडिशातील वाहनचालकांची एक संघटना ‘एकता महासंघा’ने दिलेल्या माहितीनुसार, विमा, निवृत्तीवेतन आणि कल्याण बोर्ड स्थापन करण्याची वाहनचालकांची मागणी आहे. त्यासाठी ओडिशातील सर्व व्यावसायिक वाहनचालकांनी बुधवारी संपाची घोषणा केली होती. - वास्तविक, सरकारच्या आश्वासनामुळे चालकांनी आपला संप ९० दिवसांसाठी स्थगित केला आहे. ९० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारला जाईल, असे संघटनेने म्हटले आहे.

२२ वर्षीय नरेश प्रस्का असे नवरदेवाचे नाव आहे. लग्नस्थळी पोहोचण्यासाठी ते १६ मार्च रोजी निघाले. वऱ्हाडासाठी त्याने ४ एसयूव्ही वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, चालकांच्या संपामुळे यापैकी एकही वाहन आले नाही. नरेशने सांगितले की, आम्ही आवश्यक सामान दुचाकी वाहनांद्वारे विवाहस्थळी पाठवून दिले. त्यानंतर ८ महिलांसह आम्ही सुमारे ३० वऱ्हाडी पायीच निघालो. हा अनुभव अविस्मरणीय राहिला, हे मात्र खरे. आमच्यासमोर अन्य कोणता पर्यायच नव्हता. कारण, एकही चालक चालण्यास तयार नव्हता. 

टॅग्स :Odishaओदिशा