शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

राज्यसभेत जीएसटी रखडले

By admin | Published: December 24, 2015 12:08 AM

संसदेच्या वादळी अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली. सरकारने आटोकाट प्रयत्न करूनही महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवता आली नाही.

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीसंसदेच्या वादळी अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली. सरकारने आटोकाट प्रयत्न करूनही महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवता आली नाही. विशेषत: राज्यसभेतील कामकाजाच्या खोळंब्यामुळे सभापती हमीद अन्सारी यांच्यावर उद्विग्न होण्याची पाळी आली. सभागृहांची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी खासदारांनी आत्मपरीक्षण करावे, अशी समजही त्यांनी दिली. शेवटच्या दिवशीही अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसद दणाणली. काँग्रेसने लोकसभेत सभात्यागाचा मार्ग अवलंबला. राज्यसभेत विरोधक सरकारवर वरचढ बनल्याचे चित्र दिसून आले. उत्तर प्रदेशात राममंदिराच्या नावावर दंगली भडकण्याचा प्रयत्न होत असल्याचा मुद्दाही गाजला. संसदेचे कामकाज संपले असले तरी बाहेरील वातावरण तापले आहे. सरकारने विरोधकांबाबत सूडाचे राजकारण अवलंबले त्यामुळे कामकाजाच्या खोळंब्यासाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. लोकसभेत ८ तास ३७ मिनिटांचे कामकाज वाया गेल्याचे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.२६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अधिवेशनात केवळ २० बैठकी झाल्या. राज्यसभेत कामकाजाचे ४७ तास वाया गेले. काँग्रेसने गदारोळ घालणाऱ्या मुद्यांची एकापाठोपाठ भर घातली. लोकसभेचे कामकाज तुलनेत चांगले राहिले. एकूण १३ विधेयके पारित झालीत. विरोधकांनी गोंधळ घालूनही वाढती महागाई, पूर, दुष्काळासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चाही झाली.