शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

CoronaVirus News : "भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती असल्याने त्यांना होत नाही कोरोनाचा संसर्ग"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:42 IST

BJP Govind Patel And CoronaVirus News : अनेक नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान गुजरातमधील भाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तस सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अनेक नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान गुजरातमधीलभाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. "भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही" असं म्हटलं आहे. 

राजकोट (दक्षिण) मतदारसंघाचे भाजपा आमदार असणाऱ्या गोविंद पटेल (Govind Patel) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही असं पटेल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी हे विधान केलं आहे. "जे खूप मेहनत करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही" असं त्यांनी म्हटलं आहे. 

गेल्या महिन्यामध्ये स्थानिक निवडणुकांसाठी प्रचार करताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना देखईल कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचबरोबरच राज्यामध्ये पक्ष संघटनेचे प्रमुख सी. आर. पाटील यांच्यासहीत सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ गेला आहे. वडोदऱ्याचे भाजपाचे खासदार रंजनबेन भट्ट यांनी शनिवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. उपचारांसाठी आपण रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचंही भट्ट यांनी सांगितलं आहे. 

 राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी स्थानिक निवडणुका आणि अहमबादामध्ये कसोटी तसेच टी-२० मालिका आयोजित केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा फेटाळून लावला आहे. "संविधानातील तरतुदींनुसार स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. क्रिकेटचे सामने केवळ अहमबादामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीला या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकाही झाल्या नाहीत आणि क्रिकेटचे सामनेही झाले नाहीत. मात्र देशामध्ये कोरोना संसर्गाची रोजची जी आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत" असं म्हटलं आहे. 

"जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का नाही घालत?", तीरथ सिंह रावतांचं पुन्हा वादग्रस्त विधान

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. रावत यांनी "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या विधानाने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं" असं रावत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाGujaratगुजरातIndiaभारतVijay Rupaniविजय रूपाणी